भारत
रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग
करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत
रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी
हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला
आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी
ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला
आहे. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय
उपलब्ध करून घेण्यात आली. त्यानंतर १२ जणांना मरणोपरांत भारतरत्न दिले
गेलेले आहे. आत्तापर्यंत ४१ जणांना ‘हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न
पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत.
नुकतेच,भारतरत्न पुरस्काराच्या निवड
प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या लोकांनाही आता
या पुरस्काराने सन्मानितकरता येऊ शकते.यातील निवडक श्रेणीला भारतरत्न
देण्याची अट काढुन टाकण्यात आली आहे. तशी अधिसूचना व रजपत्र जारी करण्यात
आले आहे. २ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद
यांच्या हस्ते दिला गेला.
१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना
मरणोपरांत ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात दाखल
केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत
काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्युचा कुठलाही पुरावा
उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा
युक्तिवाद करण्यात आलेला होता.
सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी
व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका
बाजूवर मधोमध सूर्याची प्रतीमा, त्याच्या वरच्या बाजूला हिंदी भाषेत
‘भारतरत्न’ असे लिहिलेले असे व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ
असावी. तसेच पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे प्रतिकचिन्ह आणि त्या
राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर
वर्षभरात त्यात बदल होत जात सद्ध्या दिले जाणारे स्मृतीचिन्ह पक्के
करण्यात आले. सध्याचे ‘भारतरत्न’ पुरस्काराचे स्वरुप म्हणजे एका सोनेरी
पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्यप्रतीमा व तिच्याखाली ‘भारतरत्न’ असे
शब्द व दुसऱ्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह “चौमुखी सिंहाची प्रतीमा’
अशा प्रकारचे पदक आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी
किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये
स्थान मिळते.
हा लेख www.wikipedia.org वरून घेण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा